पाणी जर गढूळ असेल, किंवा सतत उमटणारया लाटांनी अस्थिर असेल, तर त्यात प्रतिबिंब बघता येत नाही. तसचं मनाचं आहे. मनात कुठलेही विचार असतील, मग ते चांगले वाईट कुठलेही असोत, त्या विचारांमुळे मन अस्थिर होतं. शरीराला अपचन झालं कि जसं आपण लंघन करतो, आहारावर नियंत्रण करतो, तसचं मनाला अपचन झालं कि निर्विचार होण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाचं शुद्धीकरण करायला हवं.
No comments:
Post a Comment